मार्केट यार्ड चौक ते स्वस्तिक चौक पर्यंतचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद
अहमदनगर - अहमदनगर शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर बसविलेल्या पथदिव्यांमुळे चांगला लखलखाट असला तरी उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. या पुलाखालील मार्केट यार्ड चौक ते स्वस्तिक चौक पर्यंतचे पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुलावर बसविलेल्या पथदिव्यांचा आणि उड्डाणपुलाखाली करण्यात आलेल्या आलेल्या विद्युत व्यवस्थेच्या वीजबिलाचा खर्च महापालिकेने की राज्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करायचा याचा वाद चालू आहे, त्यातच मार्केट यार्ड चौक ते स्वस्तिक चौक पर्यंतचे उड्डाणपूलाखालील बसवलेले पथदिवे बंद गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून या भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. या अंधारामुळे अपघाताची शक्यता आहे, तसेच उड्डाणपूल झाल्यापासून रात्रीच्या वेळी पुलाखालील रस्त्यावर अनेकांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत.
या अंधाराच्या साम्राज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे फावते असून, आणखी काही लुटमारीच्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बंद पडलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करून ते चालू करावेत, अशी मागणी या परिसरातील व्यवसायिक करत आहेत.
Post a Comment